जिल्हा शिक्षकांना आता बदल्यांपासून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कारण शिक्षकांची बदली न करण्याचे धोरण राज्य सरकार आखत असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.की, ग्रामविकास खात्याशी चर्चा करूनच व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊनच हे धोरण अंमलबजावणी करण्याचे सांगितले.
शिक्षण मंत्रीशिक्षण मंत्री बोलते वेळेस हे पण म्हणाले की शिक्षकांच्या बदल्या न करण्याचे निर्णय घेण्याच्या विचारात आम्ही आहोत. कारण माध्यमिक शाळांमधील शिक्षक बरेच दिवस एकाच ठिकाणी शिकवतात ग्रामीण भागात तसेच शहरी भागात उत्तम प्रकारचे विद्यार्थी शिक्षक घडवतात . केवळ जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या होतात त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या कराव्या की न कराव्या यावर आम्ही विचार करत आहोत.त्यामुळे हा एक धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटला विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल.
या अगोदर शिक्षक बदल्यांसंदर्भात समितीने 26 शिफारशी केलेल्या होत्या. त्यामध्ये महिला शिक्षकांना ग्रामीण भागात जाऊन शिकवावे लागेल. अशा प्रकारची सुद्धा शिफारस करण्यात आली होती तर आता यापुढे पाहणे आवश्यक आहे की राज्य सरकार यावर काय निर्णय घेते.
